बहुमताने छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेत पाठवा -मधुरिमाराजेंचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) पाचगावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे ठोस उत्तर हवे असेल तर छत्रपती शाहू महाराजांना बहुमताने लोकसभेत पाठवा असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी सोमवारी केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महायु विकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे आयोजित केलेल्या विविध बैठकामध्ये मधुरिमा राजे यांनी हे आवाहन केले.

 सोमवारी सायंकाळी  मधुरिमाराजे यांनी बालाजी पार्क व पाचगाव येथील प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. या अंतर्गत बालाजी पार्क मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराचा मोर्चा पाचगावकडे वळवला. पाचगाव मधील भैरवनाथ मंदिरात भैरवनाथाचे दर्शन घेऊन या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी पाचगावच्या नागरिकांनी मधुरिमाराजे यांचे स्वागत करून छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयासाठी सर्वतोपरी साथ देऊ  असा विश्वास दिला.

     यावेळी बोलताना मधुरिमा राजे म्हणाल्या , “राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा छत्रपती घराण्याची मोठी ताकद आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज आंतरवाली सराटी येथे गेले होते .तेथून परत येत असताना वाटेत शेतकरी आंदोलन सुरू होते .त्यावेळी शेतकरी आंदोलकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील छत्रपती शाहू महाराजांनी दिली होती.

About The Author