निरंकारी भक्तांकडून देशभरात 30,000 तर सांगलीत 369 युनिट रक्तदान संकलन

सांगली (प्रतिनिधी)
प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी मिशन मार्फत यंदाही २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ प्रेम व बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’ श्रद्धा व भक्तीभावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. यानिमित्त मिशन कडून देशभर रक्तदान मोहीम राबवण्यात आली. संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतात सुमारे 500 हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबीर राबवले गेले.
संत निरंकारी हेल्थ सिटीच्या मेडिकल डायरेक्टर गीतिका दुग्गल यांनी माहिती देताना सांगितले, देशात या शिबिरामुळे 30,000 यूनिट रक्त संकलित करण्यात आले. केवळ दिल्ली येथील शिबिरात जवळपास 1000 युनिट रक्त जमा करण्यात आले. संत निरंकारी सत्संग भवन सांगली येथेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 369 भाविकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
मानव एकता दिवसाच्या निमित्ताने संत निरंकारी सत्संग भवन सांगली या ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले. साताऱ्याचे झोनल प्रमुख प.आ.नंदकुमार झांबरे, झोनल प्रमुख सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल सत्संग संपन्न झाला. येथे सांगली, मिरज, नरवाड,जत,कवठेमहांकाळ,सलगरे, देशिंग इ. ठिकाणांहून हजारो अनुयायांनी उपस्थित राहून सद्गुरुंचा आशिर्वाद घेतला.