पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेच्यावतीने रविवारी निपाणी कडकडीत बंद

निपाणी, (प्रतिनिधी) – काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. ही घटना देशासाठी हृदयविदारक असून या घटनेच्या निषेधार्थ आणि यामध्ये मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निपाणी व्यापारी संघटनेच्यावतीने आज रविवार दि. २७ रोजी निपाणीतील समस्त नागरिक, सर्व मंडळे, सेवाभावी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, महिला मंडळे, व्यापारी असोसिएशन्स, बँक कर्मचारी, धार्मिक संस्था, ट्रस्ट मंडळांचे विश्वस्तांना एक दिवस कडकडीत बंद पाळावा. तसेच सांयंकाळी ५ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सुरू होणाऱ्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निपाणी व्यापारी असो. तर्फे करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा म्हणाले, काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला अत्यंत क्रुरपणाचा कळस आहे. निष्पाप नागरिकांचे प्राण घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थीतीत कडक शासन झाले पाहिजे. ही घटना देशासाठी हृदयविदारक आहे. भारत हा शांतता प्रिय देश आहे. शांतताप्रिय आहे दुर्बल समजू नका. आम्ही कदापी गप्प बसणारा नाही. अशा घटना घडवून आणणाऱ्यांच्या कडक कारवाई करावी. या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्या दिवंगत देशवासियांच्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजच्या मुक मोर्चात नागरीकांसह युवक युवती व महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी दिपक वखारीया म्हणाले. हा प्रसंग देशावर घडलेला प्रसग आहे. त्यामुळे या प्रसंगाचा निषेध संपूर्ण देश करणार आहे. देशाच्या एकात्मतेला तडा देणाऱ्या प्रवृतीचा निषेध करूया असे सांगितले. तर सुनिल कांबळे म्हणाले, देशावर झालेला घातक हल्ला हा प्रत्येक भारतीयावर झालेला हल्ला आहे. यामागे असणाऱ्या पाकिस्तानला आता कायमचा धडा शिकविण्याची वेळे आली असल्याचे सांगितले. यानिमीत्ताने आज रविवारी निपाणी शहरातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार असून सायंकाळी ५ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातुन मुक मोर्चा साखरवाडी, नगरपालिका, जुना मोटर स्टॅन्ड, नरवीर तानाजी चौक, कोठीवाले कॉर्नरमार्गे कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे येवून निपाणी तहसिलदार याना निवेंदन देवून सांगता हेणार आहे. यावेळी अजित वखारीया, बसवराज जडी. कौशीक मेहता, सुरज राठोड, अविनाश खांडके, नंदकुमार शाह, युरेश गांधी, संदिप माने, जुबेर बागवान, अक्षय पुरंत, राहुल कोठारी, मिलींद मेहता, भगदाराम सोळंखी, अर्शद बागवान यांच्यासह निपाणी परिसरातील विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.