मिरज ग्रामीणमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा खिंडार

प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांचे उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते जनसुराज्यमध्ये
मिरज (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ होत असून, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला मोठे धक्के बसत आहेत. सलगरे, कानडवाडी, आरग आणि बेडग या गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात आज जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे मिरज तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असून जनसुराज्य शक्ती पक्ष वेगाने मिरज तालुका काबीज करत असल्याचे चित्र आहे.
आज सलगरे येथील संग्राम कांबळे, कानडवाडीचे अंकुश भोरे, रामदास भोरे, आरग येथील संतोष चव्हाण, बेडग येथील ज्ञानेश्वर जाधव या सर्वांनी जनसुराज्य शक्ती पक्षमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागू असून नाराज गट जनसुराज्य शक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांचे नेतृत्वावर विश्वास वाढल्याने ग्रामीण भागातील शेकडो आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत.
यावेळी महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे, अमर पाटील, प्रवीण धेंडे, अरविंद पाटील, जयसिंगतात्या चव्हाण, सलीम पठाण, योगेश दरवंदर, मलिक, शुभम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.