ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम : ‘कन्यादान योजना’तून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ला नवा वेग

0
kuravali

ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम : ‘कन्यादान योजना’तून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ला नवा वेग

हळदी /प्रतिनिधी  कुरुकली (ता. करवीर) – “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या शासनाच्या संदेशाला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देत कुरुकली ग्रामपंचायतीने जिल्ह्यात एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीने ‘कन्यादान योजना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करून प्रत्येक मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावावर पाच हजार रुपयांची मदत देण्याची योजना सुरू केली.

            गावातील पहिल्याच काही लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने धनादेश प्रदान करत *‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’*चा संदेश देण्यात आला. यावेळी मातांना सन्मानपूर्वक पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ आर्थिक मदतपुरता मर्यादित न राहता समाजातील विचारप्रवाह बदलण्याचा एक प्रभावी प्रयत्न ठरला आहे.

     या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच रोहित चंद्रकांत पाटील, ग्रामसेवक एस. वाय. पाटील, उषा पाटील, तसेच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाभार्थी म्हणून अभिजीत शिवाजी पाटील, विशाल नामदेव पाटील, जयदीप रंगराव पाटील यांच्या कुटुंबियांना धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

   सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले की, “मुलगी ही कुटुंबाची शान आहे. तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी ग्रामपंचायतीचा छोटासा प्रयत्न तिच्या उज्ज्वल जीवनाची पायाभरणी ठरेल, अशी आमची भावना आहे.”

   ‘कन्यादान योजना’मुळे कुरुकली गावात बालिकांच्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबात या योजनेबद्दल कौतुकाची भावना असून, इतर ग्रामपंचायतींनीही हा उपक्रम आदर्श मानून राबवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

   ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ला केवळ घोषवाक्य न राहता कृतीत उतरविण्याचे उदाहरण सादर केले आहे. कुरुकलीने खरंच दाखवून दिलं – “जिथे मुलींचा सन्मान, तिथेच गावाचा खरा मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *