बापूजी साळुंखे महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय परिषद

0
image (1)

मिरज (प्रतिनिधी)

येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या ‘वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि.८) मार्चला डेव्हलपमेंट ऑफ इंडिया डायमेन्शन्स अँड डायनामिक्स या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे व बीजभाषक म्हणून केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक येथील प्रा. डॉ. आर. आर. बिरादार आणि अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या सत्राचे साधन व्यक्ती म्हणून मा. प्रा. डॉ. एम. एस‌. देशमुख (अधिष्ठाता, मानव्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) तर अध्यक्ष म्हणून मा‌. प्रा. डॉ. व्ही. बी. जुगळे (माजी विभागप्रमुख, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात मा. प्रा. डॉ. ए. एम. गुरव ( विभाग प्रमुख, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) व अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. एस. एस. कुलकर्णी (विभाग प्रमुख, कॉमर्स विभाग, कन्या महाविद्यालय, मिरज) हे उपस्थित राहणार आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे समारोप करतील.

या परिषदेसाठी देशाभरातील विविध राज्यातील व विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे मिळून ११५ पेक्षा अधिक शोधनिबंध आले असून ते परिषदेच्या दिवशी ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित केले जाणार आहेत. परिषदेसाठी आजपर्यंत १७५ अभ्यासकांनी नावनोंदणी केलेली आहे. सदर परिषदेमध्ये आसपासच्या परिसरातील महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभागी होऊन परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *